सामाजिक नेतृत्व

संघाच्या दैनंदिन शाखेतून व अन्य कार्यक्रमांतून स्वयंसेवकांच्या मनात सामाजिक जाणीव, समाजाविषयी संवेदना, सेवाभाव, समानुभूती, कर्तव्यभाव जागृत होतो. त्यामुळे असे संघाच्या मुशीतून घडलेले स्वयंसेवक सामाज आणि राष्ट्रकार्यासाठी सदैव तत्पर असतात. चंद्रकांतदादांची देखील याच मुशीतून जडण घडण झालेली आहे.
अभाविपच्या कार्यकाळात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समरसता रुजविण्यासाठी आणि स्वा.सावरकरांच्या सामाजिक कार्याची महती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी समताज्योत यात्रेचे आयोजन करून महाराष्ट्रभर सामाजिक अभिसरणाचे त्यांनी नेतृत्व केले. तसेच मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार करण्याच्या अभियानात सिंहाचा वाटा दादांचा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊन त्यांच्या मराठवाड्यातील शैक्षणिक कार्यास अभिवादन करण्यासाठी समाजामध्ये कटू भावना निर्माण होऊ न देता सर्व समाजाला समान पातळीवर आणून सामंजस्य निर्माण करून अत्यंत शांतीपूर्ण वातावरणात हा नामविस्तार कार्यक्रम घडवून आणण्यात त्यांची भूमिका महत्वपूर्ण होती.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून थांबल्यानंतर, त्यांनी पुन्हा सामान्य नागरी जीवन सुरू करण्याचा निर्णय घेतला. या वेळी ते सुरुवातीला मुंबईऐवजी आपले मूळ गाव गारगोटी, जिल्हा कोल्हापूर येथे स्थायिक झाले. सर्वप्रथम त्यांनी आपल्या उदरनिर्वाहाचा मार्ग शोधण्यास सुरुवात केली. या वेळी त्यांना त्या भागातील काजूपासून काजू गर निर्मितीसाठी तेथील शेतकऱ्यांना करावी लागणारी मेहनत आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणींची जाणीव झाली. कारण, त्या काळात काजूपासून काजू गर निर्माण करण्याचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात उपलब्ध नसल्याने काजू उत्पादक शेतकऱ्यांना आपला कच्चामाल दूर, केरळमध्ये घेऊन जावा लागत होता.
त्यामध्ये शेतकऱ्यांपुढे वेळ आणि पैसा याची मोठीच अडचण असायची. त्यामुळे चंद्रकांतदादांनी सुरुवातीला या प्रश्नावर काम करण्यास सुरुवात केली; आणि अभाविप कार्यकर्त्यांच्या संपर्कातून खानापूर भागात काजू प्रक्रिया उद्योग सुरू केला. त्याचा या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होऊ लागला. आज या भागातच काजूवर प्रक्रिया होऊन काजुगराची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जाते. या सर्व मालाला उत्तम अशी बाजारपेठ पण मिळाली आहे. दादांच्या दूरदृष्टी आणि कल्पकतेमुळेच आज या भागातील काजू उत्पादक शेतकरी सक्षम आणि स्वावलंबी बनला आहे.
संघ कार्याचा वाढता व्याप आणि प्रवास यामुळे दादांनी गारगोटीहून कोल्हापूर येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांनी संचार माध्यमाच्या क्षेत्रात काम करणारी टेलीमॅटीक्स प्रायव्हेट लि. या कंपनीची स्थापना केली. या माध्यमातून इंटरकॉम, फॅक्स, वायरलेस,इत्यादी विवध उपकरणांच्या व्यवसायातून अनेक होतकरूंना रोजगाराची संधी उपलब्द करून दिली. मुळ सामाजिक पिंड असलेला माणसातला माणूस त्यांना सामाजिक कार्याविषयी अस्वस्थ करत होता.
आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनक्षमता विकसित करणे आणि औपचारिक शिक्षणाला अनौपचारिक शिक्षणकृतीची जोड देणे या दोन प्रमुख उद्देशांतून कोल्हापूरमध्ये खेळघर उपक्रमाची सुरुवात झाली. सध्या शहरातील २३ ठिकाणी हा उपक्रम कार्यन्वित असून, प्रत्येक खेळघरात २० ते २५ असे आर्थिकदृष्टया वंचित कुटुंबातील सुमारे ५०० विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेत आहेत. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक विकासात एक मैलाचा दगड ठरला आहे.
कोल्हापुरातील प्रसिद्ध अशा स्वयंसिद्धा या कांचनताई परुळेकर यांच्या महिला सबलीकरणाच्या अत्यंत सृजनशील उपक्रमात आवश्यकतेनुसार आणि दिव्यांगाच्या क्षेत्रात कार्यरत अशा नसिमताई हुजरुख यांच्या कार्यास दादा नेहमीच सर्वार्थाने मदत करत असतात आणि आजही ते या दोघींचे भाऊ म्हणून सदैव त्यांच्या पाठीशी उभे असतात.
गावे समृद्ध झाली तर देश समृद्ध होईल हे जाणून, महात्मा गांधीजींनी ‘खेड्याकडे चला’ हा मंत्र दिला होता. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशभरात ‘आदर्श ग्राम योजना’ राबवली. याच धर्तीवर मा. चंद्रकांतदादा पाटील यांनीही कोल्हापूर जिल्ह्यात आदर्श ग्रामदत्तक योजनेतून मौजे दारवाड आणि खानापूर (ता. भुदरगड) ही दोन गावे दत्तक घेऊन शाश्वत शेतीचा प्रयोग राबवून गावाचा कायापालट केला.
खेळ आणि खेळाडूंना लोकाश्रयासोबतच राजाश्रय मिळाला, तर त्यांचा विकास होतो; ही लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची शिकवण राहिली आहे. त्यामुळे चंद्रकांतदादांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे धोरण नेहमीच अवलंबिले आहे. जागतिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या सुप्रसिद्ध नेमबाज तेजस्विनी सावंत व राही सरनोबत, कुस्तीपटू रेश्मा माने, बुद्धिबळपटू रुचा पुजारी अशा आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सहकार्य करण्यातही चंद्रकांतदादा पाटील यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
विविध आजारांनी ग्रासलेल्या आणि अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांच्या सेवेसाठी मेरिड-इंडिया (Medical Relief and Education Public Charitable Trust-INDIA) अंतर्गत ‘सावली केअर सेंटर’ हा उपक्रम सुरू झाला. सावलीमध्ये रुग्णांची २४ तास संपूर्ण नर्सिंग केअर, डॉक्टरांकडून तपासणी, त्यांच्या सल्ल्यानुसार आहार, फिजिओथेरपीचे व्यायाम तसेच अत्यावश्यक सेवांतर्गत एक्स-रे, अॅम्ब्युलन्स (रुग्णवाहिका), सक्शन मशीन, नेब्युलायझर, ऑक्सिजन सिलेंडर आदी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
शाश्वत शेतीसाठी पारंपारिक आणि देशी वाणांची उपलब्धता जवळ जवळ दुरापास्त झालेली असतानाच बीजमाता राहीबाई पोपेरे अशा प्रकारच्या असंख्य धान्यांची वाणं आणि बियांचे जतन करण्याचे आटोकाट प्रयत्न स्वतःची आर्थिक स्थिती नसतानाही महत्वपूर्ण कार्य वर्षानुवर्षे करत आहे. या बीजमातेला देशी वाणांचे मोठ्या प्रमाणात जतन करण्याची मनोमन इच्छा आहे, पण आर्थिक परिस्थिती आणि पायाभूत सुविधेच्या अभावामुळे ते शक्य होत नव्हते. अशातच २०१८ साली पुण्यात एका पुरस्कार प्रदान कार्यक्रमात बीजमाता राहीबाईंनी आपल्या मनीची व्यथा त्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर मांडली आणि चंद्रकांतदादांनी तत्काळ त्यांची व्यथा समजून घेऊन त्यांना देशी बियाणांची बँक उभी करून देण्याविषयी आश्वस्त केले आणि ६ महिन्यातच त्यांच्या गावी कोंभाळणेपाडा, तालुका अकोले, जि. अहिल्यानगर येथे २५०० चौरस फुटांच्या जागेत शास्त्रशुद्ध पद्धतीची बीजपेढी (Seedbank) बांधून दिली. या बीजपेढीत ५४ पिकांच्या ११४ देशी वाणांचे जतन शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यात येत आहे.
स्वयंदीप फाउंडेशन (चाळीसगाव) आणि दीपस्तंभ फाउंडेशन (जळगाव) च्या माध्यमातून दिव्यांगासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या दोन्ही ठिकाणी चंद्रकांतदादांनी दिव्यांगच्या आवश्यकतेनुसार व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच दीपस्तंभ फाउंडेशनला त्यांच्या इमारत उभारणी मध्ये ही भरीव सहकार्य केलेले आहे. दिव्यांगामध्ये असलेल्या बौद्धिक क्षमतांचा विकास करून त्यांना नागरी सेवांमध्ये संधी उपलब्ध करून देण्याचे मनस्वी कार्य श्री यजुवेन्द्र महाजन एक मिशन म्हणून गेली कित्येक वर्षे करत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधायुक्त इमारतीच्या उभारणीमध्ये दादांनी भरीव अशी मदत केली आहे, आणि आजही ते यजुवेन्द्र महाजनांच्या या कार्यात त्यांच्या मोठ्या भावाच्या भूमिकेतून सर्वोतपरी सहकार्य करीत असतात.
पर्यावरणाचे महत्त्व पुढच्या पिढीला कळण्यासाठी मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून जळगावमध्ये पर्यावरण शाळेची उभारणी करण्यात आली आहे. तसेच, आपल्या ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोथरूडसह संपूर्ण राज्यात ६५००० झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. त्यातून संपूर्ण राज्यात वृक्षसंवर्धनाची मोहीम सुरू झाली आहे. कोथरूडमधील महात्मा टेकडी, म्हातोबा टेकडी, पाषाण टेकडीवर विक्रमी वृक्षारोपण- संवर्धन सुरू आहे.

काश्मिरी विद्यार्थिनींसाठी वसतिगृह

काश्मिरमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलिस जवानांच्या मुलींना उच्च शिक्षणासाठी पुणे येथे श्री. संजय नहार हे आपल्या सरहद संस्थेच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. संजय नहार हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून चांगले मित्र आहेत. संजय नहार यांची या विषयातील धडपड आणि काम पाहता, चंद्रकांतदादांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून कात्रज भागातील गुजर निंबाळकरवाडी येथे निसर्ग सुंदर वातावरणात अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त मुलींचे वसतिगृह उभारून दिले. विद्यार्थी परिषदेत कार्यतरत असल्यापासून चंद्रकांतदादा पाटील हे देशातील अनेक संवेदनशील विषयावर काम करत होते. त्यामुळे काश्मिरी मुलींच्या शिक्षणाविषयीची आवश्यक्ता, तसेच या नव्या पिढीची नाळ इतर प्रांतांशी जुळावी या व्यापक दृष्टीकोनामुळे आज सरहद संस्थेमध्ये असंख्य मुली अतिशय सुरक्षित वातावरणात पुण्यात शिक्षण घेत आहेत.

वारकरी सेवा-विठ्ठल सेवा

शतकानुशतके महाराष्ट्राची अध्यात्मिक परंपरा आणि वैभव म्हणजे पंढरपूरची वारी! आषाढ महिना लागताच महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांची पावले पंढरीच्या वाटेने वळू लागतात. मनामध्ये आस असते विठ्ठलाच्या दर्शनाची डोळ्यामध्ये भूक असते विठूमाऊलीचे सावळे रूप भरभरून पाहण्याची. तहान-भूक हरपून हाती दिंड्या-पताका घेऊन ‘ग्यानबा-तुकाराम’च्या जयघोषात पंढरीच्या दिशेने लाखो वारकरी मार्गस्थ होतात. या प्रवासात ऊन-पाऊस याची कशाचीही त्यांना तमा नसते. वारीच्या निमित्ताने 2022 मध्ये 5000 वारकऱ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
2023 पासून दादांनी विविध दिंड्यांचे प्रमुख आणि हरी भक्त परायणांची पाद्यपूजा करण्याचा एक अभिनव उपक्रम सुरु केला. या माध्यमातून पार्मार्थिक साहित्य(भजन आदीचे), छत्री, रेनकोट आणि तंबू इ.चे वाटप केले जाते. 2023 साली 5000 वारकऱ्यांना रेनकोट आणि प्रवासी बँग उपलब्ध करुन दिली. तर 2024 साली 3000 वारकऱ्यांना टाळ, मृदंग, सतरंजी, तंबू, शबनम बॅगचे वाटप करण्यात आले. या हृद्य सोहळ्यावेळी उपस्थित वारकरी भावनिक झाले.

मुलगी शिकली प्रगती झाली.

मुलगी शिकली की घराची प्रगती होते हे आपण नेहमीच ऐकतो, पण त्यासाठी मुलींना पाठबळ आणि पोषक वातावरण उपलब्ध करुन देणे हे देखील तितकेच महत्वाचे असते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मुलींना शिक्षणासाठी मोठी धडपड करावी लागते. अनेकदा मुलींना उच्च शिक्षण मोठ्या शहरात शिक्षण घेण्याची इच्छा असते, पण कुटुंबाच्या परिस्थितीमुळे किंवा राहण्याच्या अडचणींमुळे शक्य नसते. त्यामुळे मुलींनी शिक्षण घेतलेच पाहिजे, यासाठी आग्रह असलेले दादा आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रोत्साहन देत असतात. कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील मुलींना सहज उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी कोल्हापूरमध्ये लोकसहभागातून मुलींसाठी वसतिगृह उभारून त्यांच्या शिक्षणासाठी एकार्थाने प्रोत्साहनच दिले म्हणायचे.

सावलीचे नंदनवन

आजचं युग हे अतिशय धकाधकीचं आणि स्पर्धात्मक झाले आहे. संयुक्त कुटुंब व्यवस्था ही केवळ नावापुरतीच शिल्लक राहिली आहेत. त्यामुळे घरातील एखाद्या व्यक्तीला अर्धांग वायू, कोमा, हाडे कमकुवत होणे, ऑस्टियोआर्थरायटीस, सेरेब्रल पाल्सी, स्मृतिभ्रंश, वृद्धापकाळाशी संबंधित मानसिक समस्या आणि इतर दुर्धर आजाराने ग्रासले की, त्यांना योग्य सुश्रूषेचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र, आपल्या आप्त स्वकियांची सुश्रूषा करणे सर्वांनाच शक्य होत नाही. त्यासाठी 1989 मध्ये कोल्हापूर मध्ये किशोर देशपांडे दाम्पत्याने सावली केअर सेंटर सुरु केलं. 2014 पूर्वी हे दाम्पत्य कोल्हापूरमधील एका छोट्याशा जागेत वार्धक्याने किंवा दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांवर उपचार करत होते. हे देशपांडे दाम्पत्य दादांच्या संपर्कात आल्यानंतर, सावली प्रकल्पाला गती मिळाली. दादांनी लोकसहभागातून कोल्हापूरमधील रत्नागिरी रोड येथील पिराची वाडी येथे अद्ययावत आवश्यक वैद्यकीय तसेच अन्य सोईसुविधांनी युक्त अशी इमारत उभी करुन दिली. आज या इमारतीत असंख्य रुग्ण आणि वयोवृद्ध मंडळी उपचार घेत आहेत. या वास्तूमध्ये दाखल रुग्णांची 24 तास संपूर्ण सुश्रूषा, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व सल्ला, योग्य व सकस आहार, आवश्यक व्यायाम, मसाज आदी सुविधा उपलब्ध आहेत. आजपर्यंत शेकडो रुग्णांनी सावली केअर सेंटरचा लाभ घेतला आहे.

कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी कॅथ लॅब-

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल जवळील कन्हेरी येथील काडसिद्धेश्वर मठाच्या लोकपयोगी उपक्रमांना दादा सदैव पाठबळ देत असतात. या मठाचे वैद्यकीय सेवेतही भरीव कार्य आहे. ग्रामीण भागातील रुग्णांवर अतिशय माफक दरात अद्ययावत वैद्यकीय सेवा पुरविल्या जातात. हृदय रोगाने ग्रस्त रुग्णांवर उपचारांसाठी कण्हेरी मठाला कॅथ-लॅबची आवश्यकता होती. दादांच्या प्रयत्नातून सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR) मधून ही लॅब उपलब्ध करुन दिली. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार करणे सहज सोपे झाले आहे.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर उद्यमी शहर म्हणून सुपरिचित आहे. इथले अर्थशास्त्र असंख्य लघु उद्योग तसेच फॉड्री उद्योगांवर अवलंबून आहे.त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे आणि स्टार्टअप्स आणि इन्क्यूबेशन सेंटर्सच्या माध्यमातून विकास व्हावा, आणि जास्तीत जास्त रोजगार निर्मिती व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित अभियांत्रिकी महाविद्यालयाची मागणी होती. 2017 साली माननीय दादांच्या महत् प्रयत्नातून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास मान्यता मिळाली. आज ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी या महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत.
कृषी महाविद्यालय मुलींचे वसतिगृह